आळंदी देवाची येथील गरूड ध्वजा जवळील मुख्य पुल.
सत्यप्रकाश न्यूज प्रतिनिधी : अशोक अडसूळ
आळंदी :- आळंदी परिसरात इंद्रायणी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. या गंभीर परिस्थितीमुळे आळंदी शहरात येणे सध्यातरी असुरक्षित असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.आषाढी वारीनिमित्त आळंदीच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांसाठी आणि भाविकांसाठी नगरपरिषदेने तातडीची जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे. ज्या वारकऱ्यांनी प्रवासाला सुरुवात केली आहे, त्यांना आहे त्या ठिकाणी सुरक्षित थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, कोणीही आळंदीकडे येण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी केले आहे.प्रशासनाच्या महत्त्वाच्या सूचना:पोलिस यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आदेशांचे काटेकोर पालन करावे.कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.नदीपात्र, घाट परिसर आणि बंद करण्यात आलेल्या पुलांकडे जाणे टाळावे.नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन सर्व आवश्यक उपाययोजना करत असून, सर्वांनी संयम राखून प्रशासनाला सहकार्य करावे, अशी नम्र विनंती करण्यात आली आहे.






